Lemons and Peppers: घराच्या, दुकानाच्या बाहेर लिंबू मिरची का बांधली जाते? कारण जाणून तुम्हीही चालू कराल बांधायला..

Lemons and Peppers: समाजात अशा अनेक चुकीच्या पद्धती, धारणा पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत, ज्या आजही मोठ्या प्रमाणात पाळल्या जातात. त्यातलीच एक म्हणजे, दुकानाच्या किंवा घराच्या चौकटीला बांधण्यात येणारं लिंबू मिरची. वास्तविक पाहता घराच्या चौकटीला लिंबू आणि मिरची बांधण्याला खूप मोठे शास्त्रीय कारण आहे. हे कारण जाणून तुम्ही देखील उद्यापासून लिंबू मिरची बांधायला सुरुवात कराल. मात्र याचा उद्देश फार विचित्र लावण्यात आलेला आहे. आज आपण याच विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

तुम्ही देखील अनेकांच्या दुकानात किंवा घराच्या चौकटीला लिंबू मिरची बांधल्याचं पाहिलं असेल. या वस्तू बांधण्याचे कारण सांगताना कोणाचीही आपल्या घरावर किंवा घरातील सदस्यांवर वाईट नजर पडू नये, यासाठी बांधली आहे, असं सांगण्यात येते. याविषयी अधिक सांगण्याची गरज नाही, तुम्हाला हे कारण नक्कीच माहिती असेल. ही पूर्वीपासून चालत आलेली परंपरा अनेक जण आजही जोपासतात. मात्र घराच्या चौकटीला लिंबू मिरची नक्की का बांधतात? याचं योग्य आणि शास्त्रीय कारण तुम्हाला माहिती आहे का?

घराच्या चौकटीला लिंबू मिरची बांधल्याने अनेकांची वाईट नजर तुमच्या घरावर पडते. हे कारण चुकीचं असलं, तरी घराच्या चौकटीला लिंबू मिरची बांधल्याने अनेक समस्या दूर होतात, हे मात्र सत्य आहे. लिंबू मिरची घराच्या चौकटीला बांधल्याने अनेकांची वाईट नजर घरावर पडत नाही‌, पूर्वी असं का म्हटलं गेलं? त्याचबरोबर याला शास्त्रीय काय कारण आहे? आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

वास्तू शास्त्राचं कारण

घराच्या चौकटीवर लिंबू आणि मिरची बांधलेल्याला अनेकजण अंधश्रद्धा संबोधतात. मात्र वास्तुशास्त्रानुसार घर किंवा दुकानाच्या चौकटीला लिंबू मिरच्या बांधल्याने अनेकांची वाईट नजर आपल्या घरावर पडत नाही. घरामध्ये नकारात्मकता ऊर्जा प्रवेश करत नाही. वाईट शक्तींना दूर ठेवण्याचं काम लिंबू मिरची करते. घरात प्रवेश करताना लिंबू मिरची दरवाजाच्या वरती लावल्यानंतर, संपत्तीवर देखील कोणत्याही वाईट नजरेचा परिणाम पडत नाही. असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे.

व्यवसाय वाढेल

वास्तुशास्त्रामध्ये लिंबू मिरची दुकानाच्या बाहेर लटकवण्या संबंधी काही सूचना करण्यात आल्या आहेत. जर दुकानात एन्ट्री करताना तुम्ही लिंबू मिरची बांधली, तर मिरचीचा तिखटपणा त्याचबरोबर लिंबाचा असणारा आंबटपणा अनेकांच्या विचाराचा वाईट प्रभाव कमी करण्याचे काम करते. तुमच्या संपत्तीपासून नकारात्मक ऊर्जाही हे दोन पदार्थ नष्ट करतात. साहजिकच यामुळे तुमचा व्यवसाय वाढण्यास मदत होते. अशी माहिती वास्तुशास्त्रात सांगण्यात आलेली आहे. आता आपण शास्त्रीय कारण काय आहे? हे देखील जाणून घेऊ.

काय आहे शास्त्रीय कारण?

अनेकांचा वास्तुशास्त्रावर विश्वास असतो. मात्र घराच्या किंवा दुकानाच्या चौकटीला लिंबू मिरची बांधण्याला कोणतेही वास्तुशास्त्र कारण आहे, असं महाराष्ट्र लोकशाही ठामपणे म्हणत नाही. मात्र लिंबू मिरची घराच्या चौकटीला बांधण्याला वैज्ञानिक कारण मात्र नक्की आहे. वैज्ञानिकांच्या मते लिंबू आणि मिरची हे दोन्हीं पदार्थ जर तुम्ही घराच्या चौकटीला बांधले, तर ते आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण आहे. मिरची तिखट असते, त्याचबरोबर लिंबू हे आंबट असते. साहजिकच तिखट आणि आंबट पदार्थ एकत्र आल्याने याचा उग्र वास मोठ्या प्रमाणात येतो.

उग्र वास आल्यामुळे घरातून प्रवेश करणाऱ्या माशा, त्याचबरोबर कीटक, विषाणू प्रवेश करत नाहीत. साहजिकच यामुळे अन्नपदार्थांवर माशा बसण्याची समस्या उद्भवत नाही. आणि त्यामुळे सदस्यांचे आरोग्य निरोगी राहते. घराच्या चौकटीला लिंबू आणि मिरची बांधण्याचे हे वैज्ञानिक कारण आहे. मात्र अनेकांचा असा समज आहे घराच्या चौकटीवर लिंबू मिरची बांधल्याने आपल्यावर वाईट नजरेचा प्रभाव पडत नाही.

हे देखील वाचा  मुलं आपल्या वयापेक्षा कमी मुलींकडेच जास्त आकर्षित का होतात? ही 5 कारणे जाणून तुम्हीही जाल चक्रावून..

Relationship Tips: पार्टनर आपल्यावर खरं प्रेम करतो की नाही हे कसं ओळखाल? वाचा सविस्तर..

या तीन गोष्टींमुळे पती आपल्या पत्नीवर घेतात संशय; आजच सुधारा या चुका अन्यथा.. 

Vastu Shastra: या दिशेला भिंतीवरचे घड्याळ लावल्यास तुमची वेळ होईल सुरू; जाणून घ्या या मागचे शास्त्र..

Vastu Tips: चुकूनही घराजवळ लावू नका ही चार झाडे, अन्यथा होईल सत्यानाश..

Women child development: या उमेदवारांसाठी महिला व बालविकास विभागात मोठी भरती..

Women child development: या उमेदवारांसाठी महिला व बालविकास विभागात मोठी भरती.. 

लग्नानंतर हनीमूनसाठी बाहेरच का जातात? ही पाच कारणे जाणून तुम्ही देखील जाल चक्रावून..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.