AFG vs IND T20I Squad: भारतीय क्रिकेटमध्ये भूकंप! BCCI रोहितवर मेहरबान, विराट कोहली मात्र T20 मधून आउट…

0

AFG vs IND T20I Squad: दोन दिवसापूर्वी अजित आगरकर (indian Cricket selection committee chief ajit agarkar) यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची दक्षिण आफ्रिकेमध्ये बैठक पार पडली. (Indian cricket selection committee) समितीने रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्याशी देखील चर्चा केली. दोघांनीही आम्ही टी ट्वेंटी क्रिकेटसाठी उपलब्ध असल्याचं निवड समितीला कळवला आहे. मात्र आता भारतीय क्रिकेटमध्ये भूकंप आणणारी बातमी समोर आली आहे.

दोन दिवसापूर्वी निवड समितीची बैठक पार पडून देखील अद्याप अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या t20 सिरीजसाठी भारतीय संघाच्या निवडीची घोषणा करण्यात आली नाही. खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआय (BCCI) रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) या दोघांना एकत्रित खेळताना पाहू इच्छित नाही. रोहितच्या निवडीबाबत बीसीसीआय अनुकूल आहे. मात्र विराट कोहली विषयी BCCI चे वेगळे मत आहे. विराट कोहलीला (Virat Kohli) टी-ट्वेंटी क्रिकेट मधून वगळण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) राहुल द्रविड (Rahul Dravid) निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर (ajit agarkar) विराट कोहलीच्या निवडीवर सकारात्मक आहेत. या तिघांनाही विराट कोहली t20 संघात हवा आहे. मात्र बीसीसीआय विराटच्या निवडीसाठी अनुकूल नसल्याची माहिती आहे. विराट कोहलीच्या निवडीवर बीसीसीआयने निर्णय घ्यावा, असं निवड समितीच्या पॅनलने देखील सुचित केल्याची माहिती समोर आली आहे. जय शहा (jay shah) यांचा नेतृत्वात बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांशी गंभीर चर्चा सुरू असून, पुढल्या काही तासात विराट कोहलीला टी-20 क्रिकेट मधून वगळण्यात आल्याची माहिती प्रसारित केली जाणार आहे.

आकडे, परफॉर्मन्स या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर विराट कोहलीला कोणत्याही परिस्थीतीमध्ये t20 संघातून बाहेर केलं जाऊ शकत नाही. तीनही फॉरमॅटमध्ये 50 ची सरासरी असणारा जगातला एकमेव खेळाडू विराट कोहली आहे. 2014, 2016 आणि 2022 t20 वर्ल्ड कपमध्ये विराट मॅन ऑफ द टूर्नामेंट राहिला आहे. अनेक अशक्य सामने विराटने एकहाती जिंकून दिले आहेत. यामध्ये सेमी फायनल सारख्या नॉक आउट सामन्यांचाही समावेश आहे.

एकीकडे आकडे आणि परफॉर्मन्स दमदार असला तरी विराट कोहलीला भारतीय टी ट्वेंटी संघातून वगळने हा पूर्वनियोजित कट असल्याचं आता बोलत जाऊ लागलं आहे. 2021 नंतर विराट कोहलीची t20 आणि एकदिवसीय संघाच्या कर्णधार पदावरून हकालपट्टी करण्यात आली. तत्कालीन बीसीसी अध्यक्ष सौरभ गांगुली आणि बीसीसीआयचे काही अधिकारी खोटे बोलत असल्याचं विराट कोहलीने प्रेस कॉन्फरन्सद्वारे अप्रत्यक्ष सांगितलं. आता याचाच बदला म्हणून विराट कोहलीला डावललं जात असल्याची माहिती आहे.

रोहित शर्माचे t20 आकडे प्रचंड खराब आहेत. 21 आणि 2022 मध्ये झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषकात देखील रोहित शर्मा फलंदाज म्हणून सपशेल अपयशी ठरला. अगदी सेमीफायनल सामन्यात देखील रोहितने 28 चेंडूत 27 धावा केल्या होत्या. मात्र तरी देखील रोहित शर्माला t20 संघात संधी दिली जात आहे. रोहित शर्मा आयपीएलमध्ये देखील गेले चार सीजन फलंदाज म्हणून अपयशी ठरला आहे. तरीही रोहित शर्माला ट्वेंटी संघात संधी दिल्याने, बीसीसीआय एक प्रकारे रोहित शर्मावर मेहेरबान असल्याचं पाहायला मिळत आहे.

हे देखील वाचा Airplane Mode: आता मोबाईल flight mode वर टाकूनही करता येणार इंटरनेटचा वापर; जाणून घ्या प्रोसेस..

YouTube Income Tips: यूट्यूबच्या पॉलिसीत बदल! आता पैसे कमावणे झाले सोप्पे; जाणून घ्या सर्व निकष..

IND vs AFG T20I Squad : केएल राहुलचे T20 करिअर संपुष्टात..

UPI New rules: आता एका दिवसात करता येणार पाच लाखाचे व्यवहार आणि बरच काही; जाणून घ्या डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.