Sanjay Raut criticizes Governor Bhagat Singh Koshyari

Sanjay Raut | राज्यपाल शेवटी पॉलिटिकल एजंट असतात’, संजय राऊतांचा टोला

0

विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या मुद्द्यावरुन गेले अनेक महिने राज्यपाल व महविकास आघाडी यांच्यात वाद सुरु आहे आणि हा लवकर संपेल अशी चिन्हं सध्या तरी दिसत नाहीत.  याच मुद्द्यावरून नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी   कोश्यारी यांची भेट घेतली होती.. (Sanjay Raut criticizes Governor Bhagat Singh Koshyari)

या भेटीदरम्यान राज्यपाल नियुक्त  आमदारांच्या मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याचे  सांगण्यात आले होते. भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांनी सुचवलेल्या काही नावांबद्दल आक्षेप नोंदवला होता.  त्यानंतर आता शिवसेना नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी  कोश्यारी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.  खासदार संजय राऊत हे खेडमध्ये बोलत होते.

संजय राऊत म्हणाले,  ‘राज्यपाल हे पॉलिटिक एजंट असतात. राज्यपालांची नेमणूक ही राजकीय असते. राज्यपाल तटस्थ असतात का तर अजिबात नाही. कोश्यारी हे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री होते. त्याचसोबत  केंद्रात भाजपचे मंत्री देखील होते. ते भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे सदस्य होते.  त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारक पदी सुद्धा काम केले होते. राज्यपालांबद्दल आम्हाला प्रेम आणि आदर आहे. राज्यपाल हे सरळमार्गी गृहस्थ आहेत. परंतु शेवटी ते भाजपला जे हवं आहे तेच करतील’, अशा शब्दांमध्ये राज्यपाल कोश्यारी यांचा संजय राऊत यांनी समाचार घेतला.

राष्ट्रवादीच्या आमदार दिलीप मोहितेंना इशारा

खेड पंचायत समिती सभापती निवडणुकीवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा राजकारण पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यात झालं असं की खेड पंचायत समितीवर शिवसेनेचे सर्वात जास्त सदस्य असून शिवसेनेला बहुमत देखील आहे. मात्र  खेड पंचायत समितीमध्ये सभापती मात्र राष्ट्रवादी पक्षाचा विजयी झाला.  या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत आज खेड दौऱ्यावर होते.

त्यावेळी त्यांनी महाविकस आघाडीतीलच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्यावर हल्लबोल केला. संजय राऊत म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक आहेत. आम्ही शरद पवारांचा आदर करतो. मात्र खेडमध्ये जे किडे वळवळ करत आहेत त्यांचा बंदोबस्त आम्ही करु, अशा शब्दांत संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार दिलीप मोहिते यांचा समाचार घेतला.

पुढे बोलत असताना संजय राऊत म्हणाले, ” राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षात थोडी शिस्त आणली की आमदार दिलीप मोहीते घरी बसतील. आपण भल्याभल्यांना अंगावर घेतलं आहे.  सत्ता हा आमचा आत्मा किंवा प्राण नाही. खेडमध्ये जे राजकारण करण्यात आले  ते गलिच्छ आहे.

खेडच्या विद्यमान आमदारांना थोडी जरी माणुसकी असती तर अशा प्रकारचे घाणेरडं राजकारण केलं नसतं. महाआघाडी सरकारमध्ये विषय बसून सोडवले जातात. मात्र हे आमदार महाशय… जे काही घडलं आहे त्याची आम्ही नोंद ठेवली आहे. आम्ही कुणाच्या वाटेला जात नाही. आज पोलीस शिवसेनेचे कार्यकर्ते उचलत आहेत, उद्या आम्ही त्यांना उचलू.

माहाविकास आघाडीमध्ये बीघाडी तर झाली नाही ना? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे. कारण नाना पटोले असतील, आता खेडमध्ये आमदार दिलीप मोहिते यांनी केलेलं राजकारण असेल आणि त्यावर संजय राऊत यांचे वक्तव्य यावरून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस वाढल्याचे पाहायला मिळत आहे. एकूण एवढच की, महविकास आघाडी सरकार पाच वर्ष पूर्ण करेल असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.