शिक्षक घोटाळ्याचे आरोपी ‘शिक्षण मंत्री’ तर आठवी पास पशुसंवर्धन मंत्री;नितीश कुमार मंत्रिमंडळाविषयी जाणून घ्या,सविस्तर!
बिहार विधानसभा निवडणुकीच्या ओपिनियन पोल,एक्झिट पोलमध्ये महागठबंधनचे सरकार स्थापन होईल,असं सांगितलं गेलं होतं. निकालाच्या दिवशी सुरुवातीचे कल हाती आले, तेव्हा देखील महागटबंधनचेच सरकार स्थापन होईल,असे चित्र होते. मात्र जसजसे कल हाती येऊ लागले, तसतसे एनडीएच्या बाजूने कल येण्यास सुरुवात झाली,आणि शेवटी एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले.
बिहार पुन्हा एकदा नितीश कुमारांच्या हाती असणार हे चित्र स्पष्ट झाले. नितीश कुमार यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळातील खाते वाटपही करण्यात आले. नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातील काही नेते सध्या खूपच चर्चेत आहेत. बारावी पास असणाऱ्या नेत्याला अर्थमंत्री,उपमुख्यमंत्री केल्याने विरोधकांनी या मंत्रिमंडळावर टीका केली. त्याचबरोब अनेक स्तरांमधून या मंत्रिमंडळावर टीका होताना पाहायला मिळत आहे.

*नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातील नेत्यांचे शिक्षण आणि त्यांना मिळालेली खाती याविषयी आपण माहिती घेऊया.*
तारकिशोर प्रसाद यांची बिहारचे उपमुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. त्याचबरोबर,अर्थ मंत्रालय,पर्यावरण जंगल, व्यवसायिक कर, सूचना तंत्रज्ञान, आपत्ती व्यवस्थापन,शहरी विकास,अशी खाती तारकीशोर प्रसाद यांना देण्यात आलेली आहेत. विशेष म्हणजे त्यांचं शिक्षण बारावी झालेलं असल्यामुळे सर्व स्तरातून त्याच्यावर टीका होताना पाहायला मिळत आहे.
२)नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातील शिक्षण मंत्री मेवालाल चौधरी हे देखील चर्चेत आहेत. त्यांचं चर्चेत असण्याचे कारण म्हणजे, शिक्षक भरती घोटाळ्यातील ते आरोपी आहेत. चौधरी यांच्याकडे डॉक्टरेट पदवी असुन ते भागलपुर विश्वविद्यालयाचे कुलपती देखील राहीलेले आहेत.
३) बिहारच्या दुसऱ्या उपमुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आलेल्या रेणू देवी यांचे देखील बारावी शिक्षण झालेलं आहे. रेणू देवी यांना उपमुख्यमंत्री पदाबरोबर पंचायती राज विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांना मागासवर्गी उत्थान आणि ईबीसी कल्याण उद्योग विभागाची जबाबदारीही देण्यात आलेली आहे.
४) नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातील, मुकेश सहनी यांचे शिक्षण आठवी पास झालेलं असून त्यांना मत्स्यव्यवसाय विभागाचे मंत्री करण्यात आलेलं आहे.
५) नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातील मंगल पांडे हे कला पदवीधर आहेत. त्यांना आरोग्य विभागाचे कॅबिनेट मंत्री करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर कला-संस्कृती विभागाची अतिरिक्त जबाबदारी देखील देण्यात आलेली आहे.
६) नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातील,अमरेंद्र प्रताप सिंग यांचे शिक्षण बीएससी झालेलं आहे. या मंत्रिमंडळात त्यांना कृषी,सहकार आणि ऊस विकास मंत्रालय ही खाती देण्यात आलेली आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम