Railway exam: मी पस्तीस वर्षे ‘भिक्षा’ मागून खाल्लं; मोदींच्या विधानाने खळबळ

0

एकीकडे बेरोजगारीचा दर दिवसेंदिवस वाढत असतानाच,  भारतीय रेल्वेच्या आरआरबी एनटीपीसी आणि ग्रुप डी परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी गेल्या काही दिवसांपासून बिहार उत्तर प्रदेशमध्ये आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाने आता हिंसक वळण घेतल्याचेही पाहायला मिळाले. परिक्षेत घोळ झाल्याचे सांगत विद्यार्थी आता अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून विद्यार्थ्यांचा केंद्र सरकारवर मोठा रोष असल्याचे दिसून येत आहे.

बेरोजगारीचा प्रश्‍न पुन्हा एकदा उपस्थित झाला असतानाच, या संबंधातला नरेंद्र मोदी यांनी माध्यमाला दिलेल्या एका मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोदी म्हणतायच, मी 35 वर्ष भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह केला असल्याचं सांगत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालतोय. या व्हिडिओचे अनेकांनी मीन्सही बनवले आहेत.

देशभरात सुरू असलेल्या घडामोडींवर मजेशीर कंटेंट बनवणारा, भगतराम म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या एका युट्युबरने देखील नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या विधानाची चांगलीच मजा घेतल्याचे पहिला मिळत आहे. भगतराम यांनी आपल्या युट्युबवर हा व्हिडिओ प्रदर्शित करत म्हटले आहे, आमच्या नरेंद्र मोदी यांनी ३५ वर्षं भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह केला आहे. आणि तुम्ही नोकरीच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरत आहात. तुम्ही देखील 35 वर्ष भिक्षा मागून नरेंद्र मोदींसारखा उदरनिर्वाह करायला काय हरकत आहे, असा मजेशीर व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर वायरल केलाय.

देशात आंदोलन हा विषय आता नवीन राहिला नाही. गेल्या काही महिन्यांपूर्वी आपण पाहिलं होतं, केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात देशभरातल्या शेतकरी जवळपास दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असल्याचे पाहिले. या आंदोलनात जवळपास सातशे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. हा मृत्यू नसून केंद्र सरकारने या शेतकऱ्यांची केलेली हत्या असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला.

विरोधकांकडून केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात धारेवर धरले. केंद्र सरकारने तीन कृषी कायदे माघारी घेतले असले तरी, हा निर्णय पंतप्रधानांनी आगामी उत्तर प्रदेश आणि पंजाब राज्याच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतला असल्याणा आरोपही करण्यात आला. शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर आता पुन्हा रेल्वे परीक्षेत घोळ झाल्याचे कारण सांगत विद्यार्थी आंदोलन करताना दिसून येत आहेत. 26 जानेवारीला आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याचे पाहायला मिळाले. काही विद्यार्थ्यांनी ट्रेनला आग लागल्याचा आरोप करण्यात आला.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.