Solapur: प्रस्थापितांना धक्का देत सामान्य महिला बनली सरपंच; वाचा सामान्य महिलेचा रंजक प्रेरणादायी प्रवास..

परावानंतर सहा महिन्यांनी पुन्हा विजय आणि थेट सरपंचपदी विराजमान

0

Solapur: जीवनातली प्रत्येक गोष्ट राजकारणाशी संबंधित असली तरी सामान्य माणूस राजकारणापासून दोन हात लांबच राहतो. कारण राजकारण हे फक्त पैसा आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांसाठीच असते, असा अनेकांचा समज आहे. मात्र एका सामान्य महिलेने या सगळ्या धारणा चुकीच्या असल्याचं सिद्ध करत राजकारणात येणाऱ्या आणि सक्रिय होणाऱ्या प्रत्येकासाठी एक आदर्श घालून दिलाय. माळशिरस तालुक्यातील ‘पिंपरी’ या गावातील एका सामान्य महिलेचा सरपंच पदापर्यंतचा रंजक प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. ‘ताई शिवाजी कर्चे’ असे या महिलेचे नाव आहे.

आपलं नशीब अजमवण्यासाठी 2021 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात त्या उतरल्या. हा त्यांचा पहिलाच प्रयत्न होता. मात्र या निवडणुकीत त्यांना अपयश आले. पराभवानंतर अनेकजण खचतात. मात्र त्या खचल्या नाहीत. पराभव झाल्यानंतरही त्या पुन्हा लोकांमध्ये गेल्या आणि नियतीने पुन्हा एकदा त्यांना सहा महिन्यांनंतर लगेच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी दिली. 2021 च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सदस्यांमधले दोन सदस्य अपात्र झाले. आणि सहा महिन्यात ‘ग्रामपंचायत पिंपरी’ची पोटनिवडणूक लागली.

ताई कर्चे पुन्हा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि दणदणीत विजय मिळवत त्यांनी इतिहास रचला. पुढे 2025 मध्ये ‘अंजना मारुती राणे’ यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यामुळे ‘सरपंच’पद रिक्त झालं. आणि काल 23 जूनला सरपंच पदाच्या रिक्त जागेसाठी झालेल्या निवडणुकीत 6-5 या फरकाने ताई कर्चे यांनी सरपंच पदाची निवडणूक जिंकत प्रस्थापितांना धक्का देत ऐतिहासिक विजयाची नोंद केली.

सार्वत्रिक निवडणुकीत पराभव, त्यानंतर सहा महिन्यांनी पोटनिवडणुकीत दमदार विजय, आणि आता थेट सरपंचपदी झालेल्या निवडीकडे कसे पाहता?

या प्रश्नाचे उत्तर देताना नवनिर्वाचित सरपंच ताई कर्चे म्हणाल्या, पराभवानंतर लगेच सहा महिन्यात पुन्हा निवडणुक लढवणं सोप्पं नव्हतं. हे एक स्वप्न असल्यासारखं वाटतंय. पण याचं सगळं श्रेय सुनील कर्चे साहेबांना जातं. आता सरपंच निवडीत झालेल्या विजयाचे श्रेय देखील पूर्णतः त्यांनाच जाते.

पराभवानंतर पोटनिवडणुकीमध्ये झालेला विजय आणि सरपंच पदासाठी झालेल्या निवडीचे श्रेय नवनिर्वाचित सरपंच ताई कर्चे यांनी तुम्हाला दिले, या विषयी काय सांगाल? या प्रश्नाचे उत्तर देताना समाज कल्याण अधिकारी सुनील कर्चे म्हणाले,

अजिबात नाही. त्यांनी मिळवलेले हे यश त्यांचेच आहे. हे यश कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. हा त्यांचा मोठेपणा आहे. मी फक्त निमित्त होतो. गावातून मोठ्या प्रमाणात प्रेम मिळतंय. खासकरून तरुणांचा खूप मोठा पाठिंबा आणि सोबत मिळतेय. तरुणांच्या पाठिंब्यामुळेच ऊर्जा आणि प्रेरणा मिळत असते. येणाऱ्या काळात निश्चितपणे गावात अमूलाग्र बदल करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील.

महाराष्ट्र लोकशाहीशी बोलताना ग्रामपंचायत सदस्य गणेश गेंड म्हणाले,

हा विजय मोठा आहे. गेल्या अनेक दशकापासून ज्या प्रस्थापितांची सत्ता होती त्यांचा पराभव करून सरपंच होणे मोठी गोष्ट आहे. येणाऱ्या काळामध्ये काम करण्यासाठी खूप संधी आहे. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लोकोपयोगी कामे आणि लोकाभिमुख नेतृत्व तयार करण्याचा आमचा मानस आहे. पिंपरीतील राजकारण फक्त प्रस्थापितांच्या भोवती फिरत होते सुनील कर्चे साहेबांनी त्याला फाटा दिला आहे. पिंपरी गावच्या नवनिर्वाचित सरपंच ताई शिवाजी कर्चे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा

या विजयानंतर ‘महाराष्ट्र लोकशाही’ने साहेबप्रेमी मित्रपरिवाराशी संवाद साधला. यावेळी युवा शक्ती ग्रामविकास संघटन सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रकाश कर्चे म्हणाले, साहेब प्रेमी मित्र परिवाराचा आम्ही भाग आहोत, हे आमचं मोठं भाग्य आहे. 2021 मध्ये झालेली पोटनिवडणूक साहेब प्रेमी मित्र परिवाराने हातात घेतली. आणि या निवडणुकीत आमचा विजय झाला. सुनील साहेबांचा प्रेमळ स्वभाव, निखळ भावना, आणि गावाविषयी त्यांची असणारी तळमळ या गोष्टींमुळे आम्ही तरुण त्यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाकडे आकर्षित झालो. हळूहळू साहेब प्रेमी असा एक मित्रपरिवार तयार झाला. साहेबांच्या नेतृत्वाखाली गावाचा कायापालट होणार असून, आम्ही देखील त्याचा एक भाग असणार आहोत.

हे देखील वाचा Video: ग्रामपंचायतीचा अजब कारभार! पाणी असूनही पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा नाही; वयोवृद्ध महिलांचा पाण्यासाठी टाहो..

पिंपरी ग्रामपंचायतीवर कोणाची सत्ता येणार? वाचा सविस्तर!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.